पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नक्षलवाद : बदलते स्वरूप

इमेज
स ध्या स्वतंत्र भारतातील एक हिंसक मात्र कथित वैचारिक बैठक असणारी चळवळ म्हणजे नक्षलवादी चळवळ. देशातील रेड कॉरिडॉर म्हणवला जाणारा पशूपती ते तिरूपती आणि देशातील महत्त्वाची शहरे अशा विस्तीर्ण प्रदेशावर या चळवळीने आपले हातपाय पसरले आहेत. ज्याप्रमाणे हत्तीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, त्याचप्रमाणे या चळवळीचंही आहे. “देशातील आदीवासी, गरीब, कष्टकरी, कामगार या शोषित वर्गांना त्यांचे न्याय्य हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठा आम्ही भांडलदारांचे हस्तक असलेल्या सरकारविरूद्ध संघर्ष करत आहोत” अशा अगदी कोणालाही प्रथमदर्शनी सहानुभूती आणि आकर्षण वाटावं अशा शब्दात या चळवळीचं समर्थन केलं जात. मात्र वास्तव काहीतरी वेगळंच आहे, कारण सध्या नक्षल चळवळ ही पूर्णपणे भरकटलेली असून देशात हिंसक कारवाया करून अराजक माजवणे, हाच एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे. त्यांना आता आदीवासी, गरीब, कष्टकरी आणि कामगार वर्गाशी, त्यांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. कारण आता हिंसेची आणि अराजकाची एक नशा या चळवळीस चढलेली आहे. आणि या भयंकर नशेत त्यांना परकीय शक्तींची मदत मुक्तहस्ते होत असते. त्यामुळे संविधानावर चाल

तिसरं पात्र

इमेज
अमृता प्रीतम कथा ऐकायला आपल्या सर्वांनाचं आवडतं. म्हणजे आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग म्हटलं कथेला तर ती अतिशयोक्ती अजिबातचं ठरणार नाही. अगदी लहानपणापासून ते वार्धक्यापर्यंत माणूस कथा वाचतचं असतो. त्याची सुरूवात होते ती लहानपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या कथांपासून. त्या कथा असतात प्रामुख्याने रामायण, महाभारत किंवा पुराणांमधल्या. त्यातला आशय सोडला तर कथा ऐकायची सवय तेव्हापासून सागते आपल्याला. त्या कथा ऐकताना आपण अगदी गुंगून जात असतो. त्या कथांच्या प्रत्येक पात्रात आपण नकळत स्वत:ला पाहत असतो. त्याची इतकी सवय लागते आपल्याला की रोज रात्री कथा ऐकल्याशिवाय झोपत नाही आपण. त्यानंतर मग आपल्या हातात चंपक आणि चांदोबा ही अफाट मासिकं पडतात. चांदोबातल्या विक्रम आणि वेताळाची गोष्ट वाचून थोडी भिती वाटत असली तरी ती गोष्ट एक वेगळंच गारूड करते आपल्या मनावर. चांदोबातल्या गोष्टींसोबत अतिशय सुंदर चित्रही असायची, त्यामुळे कथेतली पात्र नेमकी कशी असतील, याचाही अंदाज यायचा. चंपकमधल्या गोष्टी तर अप्रतिम असतात, चंपकवन, चिकू हे अजुनही अगदी पक्क ठसलंय मनावर. त्यानंतर मग कथेचं व्यसन लागतं आणि अधिकाधिक कथा व

वो भी एक दौर था !

इमेज
गोष्ट 'पांझरा-कान'ची “साखर कारखान्याच्या सकाळी वाजणाऱ्या पहिल्या भोंग्याच्या आवाजाने त्यांचा दिवस सुरू व्हायचा आणि शेवटच्या भोंग्याने संपायचा. मळीचा वास त्यांच्या जीवनातला एक अविभाज्य असा घटक होता. साखर कारखान्याच्या वसाहतीत त्यांचं आयुष्य गेलं, त्या वसाहतींनी खरं तर त्यांचं आयुष्य समृद्धचं केलं. ‘आदर्श वसाहत’ असं त्याचं वर्णन केल्यास अतिशयोक्ती अजिबातच ठरणार नाही. जन्म, मृत्यू, बारसं, लग्न असं सर्व काही, आयुष्यातले छोटे निर्णय ते मोठे निर्णय असे सर्व त्यांनी साखर कारखान्याच्या सोबतीने घेतले. साखर कारखाना, साखर कारखाना वसाहती, राज्यातली सहकार चळवळ आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम हा फार मोठा आणि महत्त्वाचा असा विषय आहे. तो विषय जगासमोर मांडून त्या ऐतिहासिक पर्वाची आठवण पुन्हा एकदा मला सिनेमाच्या माध्यमातून मला पुन्हा जीवंत करायची आहे.” ‘वो भी एक दौर था...’ या सिनेमांच टिझर जयंतने काही दिवसांपूर्वी पाठवलं. खान्देशातल्या पहिला साखर कारखाना म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातला ‘पांझरा-कान साखर कारखाना’. सध्या तो बंद आहे. त्याची कारणं अनेक आहेत. टिझर पाहिल्या

बीती हुई एक छोटी घड़ी

इमेज
रिश्ते बनते हैं बडे धीरे से बनने देते सूखे लम्हे को जरा शाख पे पकने देते एक चिंगारी का लगना था कि पर काट दिए आंच आई थी  जरा आग तो जलने देते एक ही लम्हे पे एक साथ गिरे थे दोनों खुद संभलते या जरा मुझको संभलने देते कोणतीही नातं असचं तर असतं. म्हणजे ते तयार व्हायला काही वेळ द्यायला लागतोच. म्हणजे परस्परांना समजून घेण्यात आणि परस्परांची नेमकी ओळख होण्यात वेळ हा लागतोच. आणि तेवढा वेळ जर दिला नाही किंवा द्यायची तयारी नसेल तर मग मात्र समीकरण काही जुळत नाही. आणि मग पुन्हा ते समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करायला लागतो. या स्थितीचं अगदी योग्य वर्णन केलंय. संपुर्णसिंह कालरा उपाख्य गुलजार. आपल्या शब्दांनी जगाला वेड लावणारा अवलिया. नुकतचं (शुक्रवारी) त्यांनी 84व्या वर्षात पदार्पण केल. चेहऱ्यावर मिश्किल हास्य, शुभ्र रंगाचा कुडता, पायजमा आणि डोळ्यांवर साधासा चष्मा अशा रूपात असणारे गुलजार हे 83 वर्षांचे झाले, यावर विश्वास बसत नसला तरी ते सत्य आहे. गुलजार हे एक वेगळचं रसायन आहे. त्यांचं लिखाण अगदी साधं आणि सोपं आहे, फारसा शब्दफुलोरा त्यात कधीच नसतो. पण ते जे कागही लिहीतात ते

ती यावी परत...?

इमेज
ती यावी परत असं नेहमीचं वाटतं पण ती खरोखरच येईल का परत ? हे मात्र नाही कळत समजा आलीच ती परत तर आनंद होईलच  पण सर्व पूर्वीसारखंच असेल का ? हे नाही समजत म्हणजे ती तशीच असेल तोही तसाच असेल दूर होताना जसं होतं सर्व तसंच आजही असेल पण एकमेकांना दोघेही असतील अनोळखी अनोळखीचं रहायचं की पुन्हा ओळख करून घ्यायची  एकमेकांची हा खरा प्रश्न वरवर सोपा वाटणारा पण उत्तर अगदी अवघड असलेला आणि मग अवघड उत्तर असलेला प्रश्न तो  तो नेहमीप्रमाणे ऑप्शनला टाकतो

दूरदर्शन

इमेज
काही दिवसांपूर्वी दूरदर्शन या सरकारी वाहिनीचं बोधचिन्ह (लोगो) बदलण्याविषयीची बातमी वाचली. दूरदर्शनचं बोधचिन्ह बदलण्यासाठी एक स्पर्धाच आयोजित करण्यात आली आहे. देशभरातून कोणालाही या स्पर्धेत भाग घेता येणार असून त्यातून सर्वोत्तम बोधचिन्ह हे यापुढे दूरदर्शनचं अधिकृत नवं बोधचिन्ह असणार आहे. ही बातमी वाचली खरं सांगायचं तर थोड वाईटच वाटलं. म्हणजे आपलं लहानपण ज्या बोधचिन्हाला पाहून समृध्द (!) झालं, ते बोधचिन्ह असं बदलण्याची खरोखर गरज आहे का ?, म्हणजे नव्या गोष्टींना विरोध वगैरे नसला तरी प्रत्येकच गोष्टीत नवेपण आणणं गरजेचं आहे का ? हे आणि असे अनेक प्रश्न मनात आले. दूरदर्शनच्या त्या बोधचिन्हाशी सर्व बालपण आणि आता बालपणाच्या आठवणी एवढ्या घट्ट जोडलेल्या आहेत की यापुढे लवकरच नवं बोधचिन्ह असणार, ही कल्पनाचं मनाला पटत नाहीये. दूरदर्शनंच एक वेगळंच स्थान समस्त भारतीयांच्या मनात आहे हे नक्की. सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी जेव्हा केबलचा इतका प्रसार झाला नव्हता तेव्हा दूरदर्शनचं आपलं मनोरंजन करत होतं, दूरदर्शनचा लोगो, त्याचं ते थीम साँग या साऱ्या गोष्टी अगदी अप्रतिम होत्या. आठवतयं... रविवारच्य

ओळख हरवलेलं शहर

इमेज
धुळे शहरात पारोळा रस्त्यावरच्या गोपाल टी हाऊससमोर (‘पिवर’ चहासाठी प्रसिध्द असलेलं धुळेकरांचं आवडत ठिकाण !) गुड्ड्या नामक गुन्हेगाराचा खून करण्यात आला. सकाळी साडेसहा – सातच्या सुमारास झालेल्या या खुनामुळे अवघं शहर हादरलं, त्याची चित्रफित काही वेळातच संपुर्ण देशभर पसरली. वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमांवर आजपर्यंत या घटनेची चर्चा सुरू आहे. फेसबुक, व्हॉट्स अप सारख्या समाजमाध्यमांवरून सदरची चित्रफित आणखी पसरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तशा सुचना जारी केल्या. गुड्ड्याच्या खुनानंतर शहरात अनेक ठिकाणी फटाके वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. शहराच्या एकूणच आरोग्याच्या दृष्टीने ही घटना अधिक विचार करण्यासारखी आहे. एका गुन्हेगाराबद्दल नागरिकांच्या मानत असलेला संताप व्यवहार्य असला तरी तो अशाप्रकारे बाहेर पडणे विचारी जनांना काळजीत टाकणारा आहे. या घटनेनंतर धुळ्यातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अगोदरच दंगलीमुळे धुळे शहराची विशेष ओळख सर्व देशभर झाली आहेच, त्यात या घटनेमुळे टोळीयुध्दासाठीही शहर ओळखलं जाऊ लागलंय. या सर्व गदारोळात धुळे शहराची न

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता

इमेज
सत्यजित आज पुन्हा एकदा तोच चित्रपट बघत होता. कितव्यांदा ? खर तर त्याने आता मोजणं सोडूनच दिल होत. म्हणजे आधी मोजायचा वगैरे नाही, पण म्हणजे लक्षात राहायचं त्याच्या. पण तो चित्रपट बघतांना आठवणीत बुडून जायला आवडायचं त्याला. म्हणजे चित्रपट त्याला स्वतःचीच गोष्ट वाटायचा. दि. २७ डिसेंबर २०१३ (२६ डिसेंबर संपून २७ लागलेला म्हणजे रात्री १२ नंतर...) वाढदिवस असल्याने Whats App वर सर्वांचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. पण तो अजूनही अस्वस्थ होतो, कारण अजून तिचा मेसेज आलेला नव्हता. तो येणार अशी त्याला खात्री होती... उगाचच दहा वेळा तिची chat window चेक करत होता. ती ऑनलाईन आहे हे पाहून सारखा अस्वस्थ होत होता. “पण मी अस्वस्थ का होतो? हे मला माहित नाही. खरच अस्वस्थ होण्यासारखं काही होता का ? आपण एखाद्या व्यक्तीसाठी अस्वस्थ होतो कारण त्या व्यक्तीच आपल्या आयुष्यातलं स्थान जरा खास असत म्हणून. मग तसं काही होतं म्हणून मी अस्वस्थ होतो का ?” अखेर १.३० वाजता तिचा मेसेज आला........ अॅमी : happy birthday सत्यजित : thanks मी जवळपास १० वेळा wts app चा DP उगाचच बदलण्याचा चाळा करत होतो... का ? ते  म

आम्ही दांभिक

इमेज
दांभिकता हे आपल्या समाजाच एक वैशिष्ट्य. प्रत्येक गोष्टीत म्हणजे खानपान, कपडेलत्ते, पेहराव, साहित्य, व्यवसाय अशा सर्व बाबतीत दांभिकता दाखवल्याशिवाय आमचं समाधानचं होत नाही. विशेष म्हणजे त्या दांभिकतेचं समर्थन धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा आदींच्या आडून करण्याचं कसब तर अगदी विशेषचं ! म्हणजे एकीकडे ‘आम्ही जात वगैरे मानत नाही’ म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र लग्नप्रसंगी जात आवर्जुन बघायची, अगदी साध्यासाध्या गोष्टी ‘आमच्यात हे चालत नाही असं’ म्हणून टाळायच्या, एकीकडे तोकडे कपडे, अंगप्रदर्शन यावर सडकून टीका करायची आणि दुसरी पैराणिक मालिकांमधील अंगप्रदर्शन आणि तोकडे कपडे भक्तीभावाने बघायचे. त्यातूनच मग ‘सॅटेनिक व्हर्सेस’ लिहिणाऱ्या सलमान रश्दींविरोधात फतवे निघतात आणि ‘बजरंगी सेना’ नामक गणंकांची टोळी खजुराहोच्या शिल्पांवर बंदी घालायची तद्दन आचरट मागणी करते. या दांभिकपणातून आपण वेळीच बाहेर पडले नाही तर समाज म्हणून आपण मागेच राहणार हे नक्की. वेश्या हा शब्द ऐकताच  अंगावर पाल पडल्यासारखे  "शी"  असे किंचाळणारे आपण प्रतिष्ठित नागरिक आपल्यात आणि वेश्येत  फारसा फरक नाही  हे विसरणारे आप

हिंसक माणिक 'सरकार'

इमेज
‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात पुष्पा कपाली या महिलेची कहाणी तर अंगावर काटा आणणारी आहे. ही महिला सात महिन्यांची गरोदर होती. माकपचे कार्यकर्ते तिच्या घरात शिरले. तिला मारहाण केली. मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. पोटातील अर्भकाचा बळी गेला. पुष्पा कपालीचा गुन्हा एवढाच होता, की ती भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत होती. एका गर्भवती महिलेला लाथाबुक्क्याने मारण्यासाठी किती क्रौर्य लागत असेल ? माकप कार्यकर्त्यांच्या क्रौर्याचे हे अपवादात्मक उदाहरण नाही. माकपचा डोलाराच या क्रौर्य आणि आणि दहशतीवर उभा आहे ! अडीच दशकांच्या काळात त्रिपुरामध्ये काडीचाही विकास न करता याच क्रौर्यावर माकपने आपल्या सत्तेचा गड शाबूत राखला.’ हिंसा आणि क्रौर्याचा 'हसरा चेहरा'- माणिक सरकार माणिक सरकार. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते. देशातील सामान्य जनतेला या माणिक सरकारांचे कोण कौतुक...  'माणिक सरकार कसे साधेपणाने राहतात, माणिक सरकार कसे कमी पैशात जगतात, माणिक सरकार कसे फक्त एक रूपया पगार घेतात, माणिक सरकार कसे लोकाभिमुख कारभार करतात, माणिक सरकार कसे त्रिपुराचा

पाऊस

इमेज
पाऊस... तसं पाहायला गेलो तर तीन अक्षरी, अगदी साधा शब्द. इतर शब्दांसारखाच अगदी. पण हा शब्द आपल्या प्रत्येकासाठी अगदी खास, जिवाभावाचा. लहानपणापासून आपल्याला हा पाऊस वेड लावत असतो. पाऊस आला रे आला की लहानपणी कागदाच्या होड्या सोडायला अगदी वेड्यासारखे धावत सुटायचो आपण. त्यासाठी कित्येकदा आई-बाबांचा ओरडा (आणि मारसुद्धा !) आनंदाने सहन करायचो आपण. कागदाच्या होड्या सोडण्यात, पावसात मनसोक्त नाचण्यात, डबक्यातलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात एक वेगळीच नशा असायची. त्यावेळी डबक्यातलं पाणी खराब वगैरे असत, त्यामुळे विविध आजार होतात हे असे विचार मनातही नसायचे आपल्या. तर असा पाऊस एकच असला म्हणजे जगाच्या सर्व भागांमध्ये तो सारखाच असला तरी त्याला अनुभवायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. शेतकऱ्याचा पाऊस, लहान मुलांचा पाऊस, कुटुंबाचा पाऊस, गरीबाचा पाऊस, श्रीमंताचा पाऊस, मित्रांचा पाऊस, मैत्रिणींचा पाऊस, प्रेमात पडू पाहणाऱ्यांचा पाऊस, प्रेमात पडलेल्यांचा पाऊस, प्रेमभंग झालेल्यांचा पाऊस (ही यादी आणखीही वाढवता येईल) अशा प्रत्येकाचा पाऊस हा वेगळाच असतो हे मात्र नक्की. हा पाऊस आपल्याला दरवषी भेटत असतो, प

सर्जनशिलता हेच डिजीटल आव्हानाला उत्तर

इमेज
  पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत 16 मे 2017 रोजी अर्थअभ्यासक अभय टिळक यांचे ‘ आव्हान डिजीटल विश्वातील रोजगाराचे ’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यात त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. सध्याच्या परिस्थितीत डिजीटल आव्हानाचा सामना करणं हे प्रत्येक राष्ट्रासाठी महत्वाचं आहे, आणि भारतासाठी तर ते अधिकच महत्वाचं. अवघ्या सातच वर्षांनंतर ही व्याख्यानमाला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करेल. त्या वसंत व्याख्यानमालेसारख्या पुण्यातल्या प्रतिष्ठीत आणि प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या मालेत मला बोलायची संधी दिल्याबदद्ल मी संयोजकांचा आभारी आहे. अर्थशास्त्रासारख्या विषयावर मला बोलायला सांगितल्याबदद्ल संयोजकांचे आभार. एक योगायोग असा आहे की या व्याख्यानमालेचे प्रणेते महादेव गोविंद रानडे हे हिंदी अर्थशास्त्राचे जनक. आणि प्रामुख्याने भारतासारख्या परसत्तेच्या अधीन असलेल्या देशाची अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर कशा प्रकारचं प्रशासन, योजना आणि कशाप्रकारच्या लोकेच्छा अंगिकारल्या पाहिजेत त्यासाठी न्यायमूर्तींनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि रानड्यांच्या आगेमागे म्हणजे फुल्यांपासून ते आंबेडकरांप