पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फडणवीस युगाची चाहुल, ‘ईडी’च्या फेऱ्यात पवारपर्व...

इमेज
काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे ‘शरद पवारांचे राजकारण आता तुम्ही शिकला आहात, तुम्ही 21 शतकातले शरद पवार आहात...’   त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना अगदी सहजपणे सांगितले की ‘मी शरद पवार का बनू, मी देवेंद्र फडणवीस म्हणूनच ठीक आहे.’  यातला हजरजबाबीपण सोडता एक महत्वाची गोष्ट अधोरेखीत होते, ती म्हणजे आजही महाराष्ट्रात एखाद्या नेत्याची राजकीय उंची मोजावयाची असल्यास त्यासाठी परिमाण हे शरद पवारांचेच वापरावे लागते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणातील आपले स्थान भक्कम केले आहे. किंबहुना शरद पवारांच्या नेतृत्वाला एकहाती आव्हान देऊन फडणवीस यांनी आपले राजकीय नेतृत्व सामर्थ्यवान असल्याचेच दाखवून दिले आहे. शरद पवार या शब्दाभोवतीच राज्याचे राजकारण दीर्घकाळपासून फिरत राहिले आहे. त्यात पवारांना आव्हान देऊ शकणारे नेतेही राज्याच्या राजकारणात होते, त्यात भाजपचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांचे नाव घ्यावे लागेल. मात्र, या सर्व

मोदींनंतर ‘शहा’च...?

इमेज
“ऐ कून घेण्याची सवय आता लावून घ्या ओवेसी साहेब. ऐकून घ्यावेच लागेल. कोणाला घाबरविण्याचा प्रश्नच नाही, पण एखाद्याच्या मनातच भय असेल, तर त्यावर आम्ही काहीही करू शकत नाही...”. लोकसभेत एनआयए सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी एआयएमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना अशा भाषेत सुनावले. त्यानंतर सभागृहात भाजपच्या खासदारांनी बाके तर वाजवलीच, मात्र समाजमाध्यमांवरही भाजप समर्थक दोन दिवस याच गोष्टीची चर्चा करीत होते. अमित शहा यांचा हा आक्रमकपणा भाजप आणि समर्थकांच्या वर्तुळात नेहमीच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. यापू्र्वी केवळ पक्षाध्य़क्ष असताना ज्या ज्या वेळी शहा भाजप मुख्यालयात असतील, त्या त्या वेळी मुख्यालयात कमालीची शांतता पहावयास मिळायची. मुख्यालयात उगाच येणाऱ्या ‘भाईसाहब’ मंडळींनी तर कामाशिवाय येणेच बंद केले आहे. एकुणच शहा यांचा आदरयुक्त दरारा असल्याचे चित्र आहे. त्यात शहा यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज लावणे अगदीच कठीण, कारण कोणाशीही बोलताना त्यांचा चेहरा अगदी कोरा असतो, कामापुरती प्रतिक्रिया देणे ते पसंत करतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या

कार्यकर्त्याचे भावविश्व जगणारा नेता

इमेज
[चंद्रकांत पाटील यांची आजच महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा हा लेख. सदर लेख दैनिक मुंबई तरुण भारतमध्ये 16 जुलै, 2016 रोजी प्रकाशित झाला होता.] “चंद्रकांत पाटील यांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ते उत्तम संघटक आहेत. त्यांचे संघटनकौशल्य हे वादातीत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असताना त्यांना मी फार जवळून पाहीलंय. सरकारमध्येही आता ते उत्तम कामगिरी करणार, असा माझा विश्वास आहे”. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे सांगतात. सध्या महाराष्ट सरकारमध्ये चंद्रकांत दादा हे महसुल, मदत व पुर्नवसन आणि सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती सांभाळत आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. चंद्रकांत दादा यांचे नेतृत्व हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेतून पुढे आले. विद्यार्थी संघटना म्हटली की संघर्ष हा आलाच. त्याचप्रमाणे दादांचे नेतृत्वही संघर्षातून तावून सुलाखून निघालेले असे ‘आंदोलनात्मक नेतृत्व’ आहे. दादांच्या नेतृत्वाचे असे अनेक पदर सांगता येतात. त्याबद्दल प्रा. दे

पश्चिम बंगाल- ममतांचे फुलटॉस आणि भाजपचे सिक्सर

इमेज
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारून ममता बॅनर्जीं यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प. बंगालमध्ये आगामी काळात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा सामना रंगणार आहे, त्याचा आढावा प्रस्तुत लेखातून घेण्यात आला आहे. ममतांच्या वर्चस्वाला सुरूंग !  पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या सुवर्णयुगास प्रारंभ होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्नशील रहावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार केले होते. कारण प. बंगालमध्ये तब्बल 34 वर्ष डाव्यांची आणि गेल्या काही काळापासून ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची एकाधिकारशाही होती. अनेक प्रयत्न करूनही प. बंगालमध्ये भाजपला आपला पाया उभा करता आला नव्हता. त्यामुळे आपण अजिंक्य आहोत, असा भ्रम ममतांना झाला होता. त्या भ्रमाचा भोपळा भाजपने 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवून फोडला आहे. मात्र, आता ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे.  ममता बॅन

पुरोगामी द्वेषाचा पराभव

इमेज
“आत्महत्या करण्यापूर्वी हिटलरही जर्मनीत खूप लोकप्रिय होता”  “मोदी – शहांनी देशात विष पसरवले आहे” “हा धक्कादायक आणि धोकादायक निकाल आहे” “हा भारतीय गोबेल्सचा विजय आहे” “मनुवादी पुन्हा सत्तेत आले” अ शा प्रकारची सुमारे विधाने करीत आपले नैराश्य लपविण्याची केविलवाणी धडपड देशातील पुरोगामी टोळी सध्या करीत आहेत.  त्यात नवीन असे काहीच नाही, द्वेष करणे हाच पुरोगामी टोळीचा व्यवसाय आहे. त्यामुळे अशी विधाने करीत गावगन्ना हिंडणे हा पुरोगामी टोळीचा आवडता छंद आणि 2014 पासून तर गावगन्ना हिंडत “अघोषित आणीबाणी आली हो”, “असहिष्णुता वाढली हो” अशा बोंबा मारण्यात जर वाढच झालेली होती. पुरोगाम्यांचा उन्माद एवढा वाढला होता की भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवून फार मोठी चूक केली आहे आणि ती चूक सुधारण्याचा ठेका फक्त आपल्याकडेच आहे, अशा विचारात पुरोगामी टोळी आकंठ बुडाली होती. पण देशातील जनता अतिशय हुशार असल्याने त्यांनी 2019 मध्ये पुन्हा मोदींनाच पंतप्रधानपदी विराजमान केले आणि पुरोगामी टोळीचा उरलासुरला आवेशही धुळीत मिळवला. त्यामुळे हा भारतीय जनतेचा विजय आहे आणि पुरोगामी द्

रामजन्मभूमी आंदोलनाचे नायक अस्ताला

इमेज
भाजपच्या आतापर्यंतच्या इतिहासात राम मंदिर आंदोलनास अतिशय महत्वाचे स्थान आहे. किंबहुना भाजपला राम मंदिरामुळे सर्वप्रथम सत्तासोपन चढणे शक्य झाले होते. मात्र, यावेळी भाजपने राम मंदिराच्या मुद्याला अलगद बाजूला सारले आहे, त्यासोबतच आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अन्य दिग्गज नेतेही यावेळी निवडणूकीच्या मैदानात नाहीत. "भाजपा के तीन धरोहर- अटल, आडवाणी, मुरली मनोहर" ही घोषणा एकेकाळी लोकप्रिय होती... नव्वदच्या दशकात लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेमुळे देशात अभुतपूर्व ‘रामज्वर’ निर्माण झाला होता. भाजपचे सहसंस्थापक असलेले लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रेद्वारे राम मंदिराच्या मुद्यास हिंदू अस्मितेशी जोडण्यात यश मिळविले होते. त्यानंतर 1992 साली कारसेवकांनी वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा उध्वस्त करीत हिंदू अस्मितेवरील आक्रमण मोडून काढल्याचा दावा केला होता. या आंदोलनामुळे भाजपला मोठा राजकीय फायदा झाला, कारण 1984 साली केवळ दोन जागांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला 1989 साली तब्बल 85 जागा मिळाल्या, त्याचप्रमाणे 1998 – 1999 साली अटल