पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजधानीत पडले मराठमोळं 'पुढचं पाऊल' !

इमेज
मराठमोळं 'पुढचे पाऊल' राजधानी दिल्ली मध्ये कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या नव्या महाराष्ट्र सदनात गेल्या आठवड्यात 5 आणि 6 मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परराष्ट्र विभागातील सचिव आणि ‘पासपोर्ट मॅन’ अशी ओळख असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने राजधानीत विविध विभागात कार्यरत असणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांना एकत्रित करून ‘पुढचे पाऊल’ या विशेष सकारात्मक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचाच एक उपक्रम म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘महाराष्ट्र महोत्सव- जागर महाराष्ट्राचा’ या दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राचा ठसा आज राजधानीमध्ये फारसा दिसत नाही. राजधानीमध्ये महाराष्ट्रास नेहमीच सापत्न वागणूक देण्यात येते. खरे पाहता देशाच्या अर्थकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या महाराष्ट्रास दिल्लीच्या राजकारणात नेहमीच कमी महत्त्व दिले जाते. अन्य राज्यांप्रमाणे राजधानीत महाराष्ट्र फारसा कुठेच दिसत नाही. अन्य राज्यांचे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष असे दबावगट राजधानीत नेहमीच सक्रियरित्या कार्यरत