पोस्ट्स

जानेवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
"नात चांगल्या प्रकारे फुलवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण,  आपला Ego बाजूला ठेवण खुप आवश्यक असत. आपण आपल्या Ego ला एवढ कुरवाळत बसतो,  की त्यातच आपण अडकून पडतो आणि मग पाहिजे तेव्हा  सकारात्मक प्रतिसाद देत नाही, आपण चुकतोय हे माहित असत आपल्याला  पण Ego काही सुचू देत नसतो.  आणि मग खुप काही घडून गेल्यावर आपण भानावर येतो,  पण तोपर्यंत जे व्हायच ते होऊन गेलेल असत.  म्हणून नात्यामध्ये जास्तीतजास्त सकारात्मक असाव आणि Ego तर अजिबातच नसावा." to be continued..... ©पार्थ
" नात्यामधला दुसरा अडथळा म्हणजे गुंतागुंत ! जर तुम्ही आपल्या भावनांबाबत स्पष्ट नसाल तर तुम्ही गुंत्याला जन्म देत असतात,  आणि त्या गुंत्यामध्ये स्वतःला आणि सोबतच समोरच्यालाही गुंतवत असतात.  तुम्हाला कळतही नसत की सुरुवातीला अगदी साधासा वाटणारा हा गुंता पुढे तुम्हाला किती त्रास देणार आहे ते… त्यामुळे कोणत्याही नात्याची सुरुवात करतांना आपल्या मनात भावनांचा कोणताही गुंता नाही ना…. हे समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ घ्या आणि मगच पुढे व्हा…" to be continued…… © पार्थ
"संवादाने खुप गोष्टी सोप्या होतात. संवादाने परस्परांना परस्परांची चांगली ओळख होते. संवादाने परस्परांत विश्वास निर्माण होतो. संवादाने आपली आपल्यालाच नव्याने ओळख होते, अगदी रोज स्वतःमधला वेगळेपणा अधोरेखित करत असतो संवाद ! आणि नात फुलवायला तेच तर हव असत.' to be continued © पार्थ
"कोणतही नात फुलवण्यासाठी आवश्यक असतो तो 'संवाद',  अगदी सुसंवादच हवा अस काही नाही. संवाद नसेल ना  आपल्या भावना कितीही खऱ्या असल्या तरी त्यांचा काहीही उपयोग नसतो.  कोणतही नात जर टिकवायच असेल तर संवाद हा हवाच  आणि जर तुम्हाला तो जमणार नसेल तर उगाच नात्यांच्या भानगडीत न पडलेलच बरं." to be continued......" ©पार्थ