पोस्ट्स

मे, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कधी कधी...!

इमेज
कधी कधी काहीतरी करावस वाटतं मग अशा वेळी काय करावं ? तर अशा वेळी चहा घ्यावा मस्तपैकी नेहमीच्या टपरीवरचा... वाटल्यास पुन्हा एकदा घ्यावा  एक कटिंग... अशा वेळी कविता वाचाव्यात पाडगांवकर किंवा ग्रेस आणि सौमित्रही... आणखीन वाचायच्या तर वाचाव्यात अटलजींच्या किंवा हरीवंशरायांच्या आणि हरवून जावं त्यात... अशा वेळी मग वाचावीत मग प्रवासवर्णनं मीना प्रभुंची आणि जगावा प्रत्येक देश... नाहीतर मग जुनी  बालभारतीची पुस्तकं पहावीत  आणि शोधावं बालपण.... किंवा मग डायरीची जुनी पानं चाळावीत आणि... नाहीतर मग कागद आणि पेन घ्यावं आणि लिहावं  मनसोक्त.... मनात येईल ते, तेवढं आणि तसंच आणि मग तेच  वाचूनही पहावं.... सापडतंय का काही नवीन ? ते शोधावं.....

गोष्ट बारीपाड्याची

इमेज
“वनवासी कल्याण आश्रमाचा उद्देश म्हणजे गावं सक्षमतेने उभी करणे आणि त्यासाठी तिथेच माणूस घडवणे. जे काही करायचं ते गावानेच करायचं, तरुणांनी त्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. हा विचार मनात रुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम करते. मला हे खूपच महत्वपूर्ण वाटते कारण मी सुद्धा याच व्यवस्थेतून उभा राहिलोय आणि गावासाठी काहीतरी वेगळ करू शकतो आहे”.                वनवासी कल्याण आश्रम नेमकं करत काय ? हा प्रश्न चैत्रामभाऊंना विचारला असता अगदी थोडक्या शब्दात दिलेलं हे उत्तर. बारीपाडा.. उत्तर महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील एक आदिवासी पाडा. धुळे, नाशिक आणि गुजरातमधील डांग या तीनही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला १००% आदिवासी पाडा. कोकणी, मावची/पावरा आणि भिल्ल या आदिवासी जमाती या पाड्यात आहेत. या पाड्यातील एक सुशिक्षित तरूण- चैत्राम पवार वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आला आणि पाड्याच स्वरूपच बदलायला सुरुवात झाली. बारीपाडा आणि वनवासी कल्याण आश्रम यांचा संपर्क येण्यापूर्वी बारीपाडा अन्य पाड्यांप्रमाणेच समस्यांनी ग्रस्त होतं- नैसर्गिक अनुकुलता असूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्यामुळे शेती नाही, पिण्याचे पा

"बरे झाले, निवडणूक हरलो !"

इमेज
"गेल्या बारा वर्षांपासून मी टीडीआरच्या व्यवसायात आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना या व्यवसायात आलो. सामान्यपणे या व्यवसायाकडे समाज काहीशा वेगळया नजरेनेच पाहतो. टीडीआरवाले म्हणजे बदमाष अशीच प्रतिमा समाजात आहे. मात्र एवढया वर्षांत मी माझी सचोटी कधीच सोडली नाही. त्यामुळेच माझी एवढी उन्नती होऊ  शकली, समाजात एक वेगळे स्थान निर्माण करू शकलो. आता मला निवृत्तीचे वेध लागले आहेत. जास्तीत जास्त वेळ सामाजिक कार्यासाठी द्यायचा आहे.'' श्यामसुंदरजी म्हणाले. श्यामसुंदर कलंत्री. टीडीआर व्यवसायातील पुण्यातील अनुभवी व्यक्ती. पुण्यातील गंगाधाम परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी मुलाखतीच्या निमित्ताने जाणे झाले. श्यामसुंदरजी म्हणजे अनुभवांचा खजिनाच. सुमारे बारा वर्षांपासून ते टीडीआरच्या व्यवसायात आहेत. अगदी काहीशे रुपयांच्या व्यवहारापासून सुरुवात केलेला माणूस आज कोटयवधीची उलाढाल करतो आहे. टीडीआर व्यवसायातील खाचाखोचा हा माणूस कोळून प्यायला आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांची व्यवसायातली वाटचाल आणि पुणे शहरातील टीडीआरविषयक अनेक गोष्टी समजल्या. श्यामसुंदरजींचा जन्म अगदी