पुरस्कार वापसी: एक स्टंटबाजी
सध्या देशभरातील साहित्यिकांमध्ये पुरस्कार परत करण्याची लागण झाली आहे. देशात वाढत असलेली असहिष्णुता हे कारण त्यासाठी हे लोक देत आहेत. मात्र खरे कारण काहीतरी वेगळेच आहे. लाल सलाम पुरस्कार परत करणाऱ्या लोकांकडे नजर टाकली तर यात बहुसंख्य हे डाव्या विचारांशी बांधीलकि सांगणारे असल्याचे दिसून येते. या सर्वांना काँग्रेसने खास पोसले आहे आणि संघ व भाजप विरोधी लढण्यासाठी आपली 'राखीव फौज' म्हणून वारंवार वापरले आहे. त्याचा मोबदला म्हणून या लोकांचा भरपूर फायदाही करून दिला आहे. काही लोकांनी तर निव्वळ चाटुगिरि करण्यात धन्यता मांडली आहे (मुनव्वर राणा यांचे उदाहरण बोलके आहे). एरवी निधर्मीवादाच्या बोंबा मारणारे हे लोक काँग्रेसच्या वळचणीला गेल्यावर बिनकण्याचे होऊन जातात. खाल्ल्या मिठाला जागायला नको ? तर या सहित्यिकांना काँग्रेसने विविध संस्थांमध्ये नेमले, समित्यांवर नेमले, महामंडळांवर नेमले. आणि त्यांचा डावा अजेंडा सुखनैव राबवता येईल, याची सोय करून दिली. काँग्रेस सरकार होते तोपर्यंत सर्व व्यवस्थित होते, मात्र १६ मे २०१४ या दिवशी भाजपा सरकार आले आणि हे लोक अनाथ झाले. एरवी लोकशाहीच्या गप्पा मार