पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संविधान बचाव ते शरियत बचाव: एक पुरोगामी प्रवास

इमेज
“मुस्लिम भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन, धर्मगुरूंना विश्वासात घेऊन काय पाऊल टाकायचं ते टाकता येईल. पण तलाक हा कुराणाने इस्लामच्या माध्यमातून दिलेला मार्ग आहे, संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याही राज्यकर्त्यांना नाही.” प्रथमदर्शनी हे विधान कोणा मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्या, धर्माला स्वत:ची वैयक्तिक जहागिरी मानणाऱ्या मुल्ला-मौलवीचे असावे, असा आपला समज होईल. मात्र तो समज साफ चुकीचा आहे. हे विधान आहे भारतीय राजकारणातील धुरंधर, फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार मानणारे आणि त्यावरच वाटचाल करणारे, नेहमी पुरोगामी भुमिकाच घेत प्रतिगाम्यांना शह देणारे असे पद्मविभुषण रा. रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांचे. धक्का बसला ना ?, पण शरदजी साहेबांचे राजकारण हे असेच, धक्के दिल्याशिवाय पुढे न जाणारे ! शरदजी साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान राज्यसरकारच्या कारभाराविरोधात ‘हल्लाबोल यात्रे’चे आयोजन केले होते. त्याचा समारोप काल औंरंगाबाद येथे झाला. समारोपाच्या सभेत शरदजी साहेबांनी वरील निखळ पुरोगामी, विवे