पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

धोका साईबाबांचा !

इमेज
मार्च महिन्यात दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्ष सुनावली. या प्राध्यापक महोदयांवर नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप होता. न्यायालयात तो सिध्द होऊन या पांढरपेशा नक्षलवाद्यास आता आपले उर्वरीत आयुष्य कारागृहात कथित क्रांतीची स्वप्न पाहत घालवावे लागणार आहे. शिक्षा सुनावताना न्यायालयाने जे म्हटले आहे ते अतिशय महत्वाचे आहे, “प्राध्यापक साईबाबा हा नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करीत असल्याचे न्यायालयात सिध्द झाले आहे. प्रा. साईबाबा 90 टक्के अपंग असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे कार्यरत असून तो माओवादी चळवळीमागील प्रेरणा असल्याचे सिध्द होते. 2008 पासून गडचिरोली जिल्ह्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या बंदी घातलेल्या संघटनेचा नेता असल्याने तो जन्मठेपच नाही, तर त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र आहे.” पेशाने प्राध्यापक असलेल्या या व्यक्तीकडून नवीन पिढी घडवण्याचे काम होणे अपेक्षित असताना देशविघातक अशा नक्षल चळवळीत त्याचे असलेले सक्रीय योगदान हे विचारी जनांना नक्कीच काळजीत टाकणारे आहे. पिढी घडविणारी व्यक्तीच जर देशविघातक अशा

फिरसे आ गए जय श्रीराम...!

इमेज
उत्तर प्रदेशासारख्या राज्याचे राजकारण हे नेहमीच वेगळ्या पठडीतले राहिले आहे. अगदी आपले संपूर्ण आयुष्य निवडणूकांच्या अभ्यासात घालविल्याचा दावा करणारे सेफॉलॉजीस्ट असो, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असो किंवा राजकीय नेते असो. या सर्वांना उत्तर प्रदेशच्या राजकारणाने कधीनाकधी चकमा दिलेला असतो. भाजपला २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ८० पैकी तब्बल ७२ जागा या राज्याने दिल्या, त्यानंतर झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तर ४०३ पैकी ३०८ जागा मिळवून मोठ्या बहुमताने भाजपला सत्ता मिळाली होती. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ८० पैकी ६२ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. त्यामुळे २०१४ पासून तरी या राज्यात भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रीपदी योगी आदीत्यनाथ यांच्यासारखा खमक्या राजकारण्याची निवड करून भाजपने विरोधकांना स्पष्ट इशारा दिला होता. मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड केल्यानंतर भाजपवर मोठ्या प्रमाणात टिकाही झाली होती. अनेकांनी तर मुख्यमंत्रीपदासाठी योगी यांनी पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर दबाव आणल्याच्याही वावडया उठवल्या होत्या. अर्था

लम्हा लम्हा

इमेज
जरा फासले पर पहुंचे तो यह एससास हुआ कोई कितने करीब से गुजर कर चला गया था काही लोक अगदी साध्या शब्दात लिहीतात. म्हणजे ते शब्द तुम्ही – आम्ही वापरतो, तेच असतात. पण त्यांचे शब्द आपल्या मनाला भावतात. असं का होत असेल ?. अर्थात, प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी, याचा हटट्ही धरायला नको. काही शब्द असेच अनुत्तरीत राहू द्यायला हवे. जेणेकरून पुन्हा त्यांच्या वाटेला गेलो की काही जुन्या आठवणी उफाळून वर यायला हव्यात. त्या आठवणी नेहमीच जीवंत रहायला हव्यात. म्हणजे काही शब्दांचे अर्थ अगदी व्यवस्थित लागतात. आता दीप्ती नवल यांच्या या दोन ओळी अनुभवायच्या असतील तर सर्व काही जागच्याजागी असून कसं चालेल ? चलो दूर तक अजनबी रास्तो पे पैदल चलें कुछ न कहें अपनी अपनी तन्हाइयां लिये सवालों के दायरों से निकल कर रिवाजों की सरहदों के परे हम यूं ही साथ चलते रहें कुछ न कहें तुम अपनी माजी का कोई जिक्र न छेडो मैं भुली हुई कोई नज्म न दोहराऊं तुम कौन हो मै क्या हूं इन सब बातों को, बस रहने दें कुछ न कहें चलो दूर तक अजनबी रास्तों पे पैदल चलें स्वत:ला विसरून असं जगण्यात एक वेगळीच मजा अस

आप क्रोनोलॉजी समझिए...

इमेज
सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्याच्या नावाखाली दिल्लीत नियोजनपूर्वक हिंसाचार घडविण्यात आला आहे. केंद्र सरकार एकाही दंगेखोराला सोडणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाचा असो अथवा कोणत्याही धर्माचा असो. पुन्हा अशा प्रकारचा हिंसाचार घडविण्याची त्याची हिंमत होणार नाही, अशी कारवाई करण्यात येईल. हिंसाचार कोणी घडविली, त्यासाठी कोणी पैसा पुरविला, कोणत्या संस्था – संघटना त्यात होत्या याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे आली आहे. त्यामुळे हिंसाचार घडवून आपण नामानिराळे राहू, असे कोणास वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे... अशा शब्दात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिल्ली हिंसाचारावरील चर्चेस उत्तर दिले. ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ हे शहांचे आवडते वाक्य. आपल्या भाषणात त्यांनी दिल्ली हिंसाचाराचे नेपथ्य कोणी आणि कसे केले हे अगदी सविस्तर मांडले, त्यामुळे त्यांच्याच शब्दात सांगावयाचे तर दिल्ली हिंसाचाराची बाजू घेणाऱ्यांना आता ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ असा सवाल सर्वांनी विचारायला हवा. सुधारित नागरिकत्व कायदा, जनगणनेसोबत होणारा एनपीआर आणि अद्याप मसुदाही तयार नसणाऱ्या एनआरसीविरोधात विशिष्ट समुदायाकडून दिल

फडणवीस युगाची चाहुल, ‘ईडी’च्या फेऱ्यात पवारपर्व...

इमेज
काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे ‘शरद पवारांचे राजकारण आता तुम्ही शिकला आहात, तुम्ही 21 शतकातले शरद पवार आहात...’   त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना अगदी सहजपणे सांगितले की ‘मी शरद पवार का बनू, मी देवेंद्र फडणवीस म्हणूनच ठीक आहे.’  यातला हजरजबाबीपण सोडता एक महत्वाची गोष्ट अधोरेखीत होते, ती म्हणजे आजही महाराष्ट्रात एखाद्या नेत्याची राजकीय उंची मोजावयाची असल्यास त्यासाठी परिमाण हे शरद पवारांचेच वापरावे लागते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणातील आपले स्थान भक्कम केले आहे. किंबहुना शरद पवारांच्या नेतृत्वाला एकहाती आव्हान देऊन फडणवीस यांनी आपले राजकीय नेतृत्व सामर्थ्यवान असल्याचेच दाखवून दिले आहे. शरद पवार या शब्दाभोवतीच राज्याचे राजकारण दीर्घकाळपासून फिरत राहिले आहे. त्यात पवारांना आव्हान देऊ शकणारे नेतेही राज्याच्या राजकारणात होते, त्यात भाजपचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांचे नाव घ्यावे लागेल. मात्र, या सर्व

मोदींनंतर ‘शहा’च...?

इमेज
“ऐ कून घेण्याची सवय आता लावून घ्या ओवेसी साहेब. ऐकून घ्यावेच लागेल. कोणाला घाबरविण्याचा प्रश्नच नाही, पण एखाद्याच्या मनातच भय असेल, तर त्यावर आम्ही काहीही करू शकत नाही...”. लोकसभेत एनआयए सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी एआयएमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना अशा भाषेत सुनावले. त्यानंतर सभागृहात भाजपच्या खासदारांनी बाके तर वाजवलीच, मात्र समाजमाध्यमांवरही भाजप समर्थक दोन दिवस याच गोष्टीची चर्चा करीत होते. अमित शहा यांचा हा आक्रमकपणा भाजप आणि समर्थकांच्या वर्तुळात नेहमीच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. यापू्र्वी केवळ पक्षाध्य़क्ष असताना ज्या ज्या वेळी शहा भाजप मुख्यालयात असतील, त्या त्या वेळी मुख्यालयात कमालीची शांतता पहावयास मिळायची. मुख्यालयात उगाच येणाऱ्या ‘भाईसाहब’ मंडळींनी तर कामाशिवाय येणेच बंद केले आहे. एकुणच शहा यांचा आदरयुक्त दरारा असल्याचे चित्र आहे. त्यात शहा यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज लावणे अगदीच कठीण, कारण कोणाशीही बोलताना त्यांचा चेहरा अगदी कोरा असतो, कामापुरती प्रतिक्रिया देणे ते पसंत करतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या

कार्यकर्त्याचे भावविश्व जगणारा नेता

इमेज
[चंद्रकांत पाटील यांची आजच महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा हा लेख. सदर लेख दैनिक मुंबई तरुण भारतमध्ये 16 जुलै, 2016 रोजी प्रकाशित झाला होता.] “चंद्रकांत पाटील यांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ते उत्तम संघटक आहेत. त्यांचे संघटनकौशल्य हे वादातीत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असताना त्यांना मी फार जवळून पाहीलंय. सरकारमध्येही आता ते उत्तम कामगिरी करणार, असा माझा विश्वास आहे”. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे सांगतात. सध्या महाराष्ट सरकारमध्ये चंद्रकांत दादा हे महसुल, मदत व पुर्नवसन आणि सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती सांभाळत आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. चंद्रकांत दादा यांचे नेतृत्व हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेतून पुढे आले. विद्यार्थी संघटना म्हटली की संघर्ष हा आलाच. त्याचप्रमाणे दादांचे नेतृत्वही संघर्षातून तावून सुलाखून निघालेले असे ‘आंदोलनात्मक नेतृत्व’ आहे. दादांच्या नेतृत्वाचे असे अनेक पदर सांगता येतात. त्याबद्दल प्रा. दे

पश्चिम बंगाल- ममतांचे फुलटॉस आणि भाजपचे सिक्सर

इमेज
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारून ममता बॅनर्जीं यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प. बंगालमध्ये आगामी काळात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा सामना रंगणार आहे, त्याचा आढावा प्रस्तुत लेखातून घेण्यात आला आहे. ममतांच्या वर्चस्वाला सुरूंग !  पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या सुवर्णयुगास प्रारंभ होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्नशील रहावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार केले होते. कारण प. बंगालमध्ये तब्बल 34 वर्ष डाव्यांची आणि गेल्या काही काळापासून ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची एकाधिकारशाही होती. अनेक प्रयत्न करूनही प. बंगालमध्ये भाजपला आपला पाया उभा करता आला नव्हता. त्यामुळे आपण अजिंक्य आहोत, असा भ्रम ममतांना झाला होता. त्या भ्रमाचा भोपळा भाजपने 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवून फोडला आहे. मात्र, आता ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे.  ममता बॅन