मन........तुटतं तेव्हा

आपलं मन. एक असा मित्र ज्याचा आपल्याला नेहमीचं आधार वाटत असतो, प्रसंगी धाक सुद्धा. अगदी साध्या गोष्टीपासून ते अगदी महत्वाच्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्यात आपल्या मनाचा आपल्याला प्रचंड आधार असतो. तर असं हे आपल मन अचानक कुणाबद्दलतरी फार विचार करायला लागतं, अगदी दिवसरात्र ते त्याच्याच विचारात असतं, त्याच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायलाही ते तयार असतं. पण.... समोरच्या व्यक्तिला त्याचं काहीच सोयरसुतक नसतं. त्याच्यासाठी तो निव्वळ एक खेळ असतो. आणि एक दिवस अचानक खेळ अर्ध्यावर मोडून ती व्यक्ति निघून जाते, मनाला एकटं सोडून. मग मात्र मन बहकतं, वेड्यासारखं वागायला लागतं. आता ते कुणावरचं विश्वास ठेवायला तयार नसत. कारण ते आतून पूर्णपणे तुटलेल असतं.......... मित्रांनो, कुणाच्याही मनाशी उगाचच खेळू नका, कारण मन तुटल्याचं दुःख फार फार मोठ असतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता