पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘अटल’ चरितकहाणी

इमेज
“अटलजी तेव्हा अवघ्या १५ वर्षांचे होते. डॉक्टरांचे एकदाच घडलेले, पण मनात घर केलेले दर्शन त्यांच्या डोळ्यांपुढून जात नव्हते. अशा अस्वस्थ आणि भारलेल्या मनस्थितीत त्यांच्या मनात एक एक शब्द जुळू लागला. कवितेची एकेक ओळ जन्म घेऊ लागली. अटल कागदावर एकेक ओळ लिहू लागला. त्या कवितेची पहिलीच ओळ होती... हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय...” माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुत्वविचार ठामपणे, मात्र अन्यांना न दुखविता मांडणारा एक कुशल राजनेता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता. प्रथम जनसंघ, अल्पकाळ जनता पक्ष आणि नंतर दीर्घकाळ भारतीय जनता पक्षाला दिशा देणारा मार्गदर्शक, आपल्या अमोघ वक्तृत्व आणि परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाने पं. नेहरूंचेही लक्ष वेधून घेणारा खासदार, लालकृष्ण आडवाणींचा सख्खा मित्र, लहानग्यांना ‘स्कुल चलें हम’ या अनोख्या गाण्याच्या रूपात सकाळी सकाळी भेटणारा प्रेमळ चेहरा, कर्तव्यकठोर पंतप्रधान आणि भारतरत्न... अशा विविध रूपांमध्ये अटलजींनी तब्बल पाच – सहा दशके